दिवंगत नेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीप्रमाणे बीड जिल्ह्याचा विकास करणार, असा शब्द दिला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा शब्द पाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. बीड दौऱ्यावर आल्या असता सुनेत्रा पवारांनी महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करत बीडकरांना आश्वासन दिलं आहे.