विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. महाराष्ट्रातील हजारो तरुण देखील रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच पंतप्रधानांवरही नाराजी व्यक्त केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, असा संताप व्यक्त केला जात आहे. राम मंदिर चोरी प्रकरण ते नीट पेपरफूटी प्रकरणात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे.