Headlines

पुण्यात तुकाराम मुंढे यांची डॅशिंग कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोवर टाच, थेट परवाना रद्द


पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरातील बर्गर किंगवर एफडीने धाड टाकली. तसेच लोहगाव येथील झेप्टोच्या गोडाऊनवरही धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने दोघांचा परवाना थेट रद्द केला आहे.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बड्या कंपन्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडक कार्यपद्धतीचा अवलंब करत अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ‘नाव मोठे पण लक्षण खोटे’ अशी अवस्था असलेल्या काही बड्या ब्रँड्सवर एफडीएने सर्जिकल स्ट्राईक केला असून, याचा दणका आता पुण्यातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’ आणि ‘झेप्टो’ कंपनीला बसला आहे.

पुण्यातील तरुणाई आणि खवय्यांची नेहमीच गर्दी असणाऱ्या कॅम्प भागातील ‘बर्गर किंग’वर प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. दररोज हजारो नागरिक चवीने जिथे बर्गर खातात, तिथेच अन्नसुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे उघडकीस आले आहे. एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीत येथे अन्नाच्या दर्जात मोठी तडजोड होत असल्याचे समोर आले. तसेच, रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर त्रुटी पाहता, मुंढे स्टाईलने कुठलीही दयामया न दाखवता या आउटलेटचा परवाना थेट रद्द करण्यात आला आहे.

नेमकी कारवाई काय केली?

अन्न आणि औषध (एफडीए) प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीए प्रशासनाकडून राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या हॉटेल आणि आस्थापनांवर छापेमारी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी विविध हॉटेल आणि आस्थापनांकडून अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे ना? याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जात आहे. एफडीएने पुण्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सर्वात मोठ्या कारवाया केल्या आहेत. लाखो पुणेकर ज्या आस्थापनांवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतात त्याच आस्थापनांवर एफडीएने धाड टाकली. यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर थेट परवाना रद्द करण्याची मोठी कारवाई तुकाराम मुंढे यांनी केली आहे.

पुण्यात बर्गर किंगचा परवाना थेट रद्द

पुण्यात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरात एफडीएने बर्गर किंगवर छापा टाकला. यावेळी खाद्य पदार्थासंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रसिद्ध बर्गर किंगवर मोठी कारवाई केली आहे. एफडीएने या बर्गर किंगचा थेट अन्न सुरक्षा परवाना रद्द केला आहे.

बर्गर किंगवर पुणेकरांचा मोठा विश्वास होता. इथे दररोज हजारो पुणेकर बर्गर खाण्यासाठी येतात. या बर्गर किंगवर पुणेकरांची नेहमी रेलचेल असायची. पण आता एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या बर्गर किंगवर छापा टाकल्यानंतर खाद्य पदार्थांबाबत गंभीर त्रुटी आढळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बर्गर किंगचा थेट परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय एफडीएने घेतला आहे.

पुण्यात Zepto कंपनीच्या गोडाऊनवर धाड

एफडीएने केवळ बर्गर किंगवर कारवाई केली नाही तर पुण्यातील लोहगाव येथील zepto कंपनीच्या गोडाऊनवर देखील धाड टाकली. यावेळी एफडीएने थेट परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. रिफ्रेजेरेटर आणि प्रोझन केलेल्या पदार्थात अनेक त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा करत सामान पोहोचवणाऱ्या ‘झेप्टो’ कंपनीलाही या कारवाईचा मोठा फटका बसला आहे. लोहगाव येथील झेप्टोच्या गोदामावर अचानक टाकलेल्या छाप्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आले.

या गोदामात पुढील गंभीर त्रुटी आढळल्या :

फ्रोझन आणि थंडगार पदार्थांसाठी आवश्यक असणारे तापमान न राखणे. एक्सपायरी डेट संपलेले अन्नपदार्थ बिनधास्त साठवून ठेवणे. तसेच साठवणूक व्यवस्थेतील कमालीची अस्वच्छता आणि कीटक नियंत्रणाचा पूर्णपणे अभाव. असल्याच या धाडीत निदर्शनास आले आहे. ​या अनागोंदी कारभारामुळे अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलत पुण्यातील झेप्टो कंपनीचा परवाना रद्द करण्याची धडक कारवाई केली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा