Headlines

अल्टिमेटम:पीओकेत मागण्यांवर ठाम लोकांवर गोळीबार, 2 ठार, 38 मागण्या पूर्ण न झाल्यास लाँग मार्च




पीओकेत (पाकव्याप्त काश्मीर) पाक लष्कराचा अत्याचार वाढत चालला आहे. रावळकोट येथे शुक्रवारी अन्न पुरवठा करणाऱ्या ताफ्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी पोहोचलेले लष्कर आणि मागण्यांवर ठाम असलेले आंदोलक यांच्यात चकमक झाली. यानंतर लष्कराने मागण्यांवर ठाम असलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केला. यामध्ये २ आंदोलकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. यामुळे पीओकेमध्ये संताप अधिकच वाढला आहे. पीओकेमध्ये १० जूनपासून सहा ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. या दरम्यान आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने (जेएएसी) सरकारला ५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कमिटीने म्हटले कि, १४ जुलैपर्यंत ३८ मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून मुझफ्फराबादसाठी लॉंग मार्च पुन्हा सुरू होईल. विशेष म्हणजे हा मार्च १० जून रोजी रावळकोट येथे रोखण्यात आला होता. शेतीवर ६६% अवलंबून, तरीही येथे अन्न संकट आंदोलन दडपण्यासाठी पीओकेमध्ये लष्कर आणि सरकारची दडपशाही सुरूच आहे. या कारवाईत १६०० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर ६० हून अधिक आंदोलक मारले गेले आहेत. संघटनेशी संबंधित अनेक नेत्यांना रासुका कायद्यांतर्गत तुरुंगात डांबण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत