Headlines

सगुण-निर्गुण: अवघा रंग एक झाला! – ganesh mohite sagun nirgun article on pandharpur ashadhi wari


-डॉ. गणेश मोहिते

पंढरीची आषाढवारी म्हणजे चैतन्याचा सोहळा. राज्याच्या कानाकोपऱ्यातून माहेरओढीने आलेला वारकरी पंढरीच्या वाळवंटी आज विसावला असेल. उद्या प्रत्यक्षात पांडुरंगाचरणी लीन होण्याचे अतर्क्य समाधान त्याला लाभेल. आषाढीला येऊन विठ्ठलदर्शने धन्य होणे या आत्मिक आनंदापोटी शेकडो वर्षे पंढरीत वारकऱ्यांचा मेळा जमतो.

उदंड पाहिले उदंड ऐकिले।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।
ऐसा विटेवर देव कोठे॥

आपल्या भक्तांसाठी भीमातीरी विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ आहे. म्हणून शतकानुशतके शेकडो मैल वारकरी पायी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत विठ्ठलाचे सावळे सगुण मनोहर रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी पंढरीत येतो तो ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रीं दिवस वाट तुझी’ या आर्त ओढीने. अशावेळेस वारकऱ्यांच्या मनात भाव एकच असतो सगुण-निर्गुण, निराकार अरुपाचे रूप असा पांडुरंग पाहणे. कारण ‘तुका म्हणे काही न मागे आणिक। तुझे पायी सुख सर्व आहे॥

विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून सुखाची अनुभूती आत्मानुभवाशिवाय कळणे शक्य नाही. या अनुभूतीपोटी वारकरी वर्षानुवर्षे येत राहतो. इथे ना कुठला भेद, ना कुठले प्रघात. समतेच्या विचारांचा उगम वारीतलाच; म्हणून तर पंढरीची वारी महाराष्ट्राची लोकसंस्कृती , तर विठ्ठोबा-रुखमाई ही आमची पिढीजात वहिवाट बनून चंद्रभागेसारखीच निरंतर इथल्या चराचरातून वाहते आहे.

वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी,
चला चला संत जन, करा देवासी भांडण,
लुटालुटा पंढरपूर, धरा रुखमाईचा वर,
तुका म्हणे चला, गाव निशाणी घातला…

जनाईच्या शिव्या, तुकोबांचा रोकडा सवाल, ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबाची आर्त हाक ऐकूनही विठ्ठल शेकडो वर्ष मौन, स्थितप्रज्ञ आहे. तो क्षणार्धात इथल्या मातीतल्या माणसांच्या सुखदुःखांशी एकरूप होतो; तेव्हा ‘अवघा रंग एक’ होतो, मीपण तूपण वाया जाते, काम, क्रोध पळून जाऊन विदेही अवस्थेची अनुभूती येते; तेव्हा अंतरंगात ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ हाच भाव दाटून येतो!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत