मुंबई : मुंबईतील विद्यार्थी श्रेष्ठ सुरैया याने 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (International Physics Olympiad – IPhO) 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळवून दिला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे झालेल्या या स्पर्धेत 87 देशांतील 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत रशिया, दक्षिण कोरिया, चीन, कझाकस्तान आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे प्रथम स्थान पटकावले.
श्रेष्ठसोबत कनिष्क जैन, ऋद्धेश अनंत बेंडाळे, ऋषित गर्ग आणि स्वरित जोशी या भारतीय विद्यार्थ्यांनाही पदके मिळाली. भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे देशाच्या विज्ञान शिक्षणाची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
श्रेष्ठचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लहानपणापासूनच वेगळा होता. शालेय अभ्यासक्रमापुरते समाधान न मानता त्याने गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये सातत्याने सहभाग घेतला. पालकांनीही त्याला विविध शैक्षणिक शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातून त्याच्या वैज्ञानिक विचारसरणीला योग्य दिशा मिळाली.
त्याची आई मीता सुरैया यांच्या मते, कोरोनाच्या काळात सातवीत असतानाही श्रेष्ठ मोठ्या भावासोबत दहावीच्या ऑनलाइन व्याख्यानांना उपस्थित राहत होता. नवीन विषय समजून घेण्याची त्याची जिज्ञासा आणि शिकण्याची तयारी यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.
होमी भाभा संस्थेतील एका अभ्यास शिबिराने श्रेष्ठच्या आयुष्यात मोठा बदल घडवला. विज्ञान आणि गणिताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहवासातून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय निश्चित केले आणि त्यासाठी कठोर मेहनत सुरू केली.
बारावीची बोर्ड परीक्षा, JEE आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडची तयारी अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत त्याने वेळेचे अचूक नियोजन केले. JEE मध्ये त्याने भारतात 58 वा क्रमांक मिळवला, तर त्याचवेळी जागतिक स्पर्धेसाठीची तयारीही सुरू ठेवली.
अभ्यासाबरोबरच श्रेष्ठने आपल्या छंदांनाही तितकेच महत्त्व दिले. त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ध्रुपद गायनाची आवड असून तो नियमित सराव करतो. टेबल टेनिसही त्याचा आवडता खेळ आहे. अभ्यास, छंद आणि शिस्त यांचा समतोल राखत जागतिक यश मिळवणारा श्रेष्ठ आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा