Headlines

बर्मिंगहॅममध्ये रो-को फ्लॉप! 6 महिन्यांनंतर मैदानात उतरुनही निराशाजनक कामगिरी; रोहित-विराट नेमके कसे आऊट झाले?


Rohit Sharma Virat Kohli Failure : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ११ आणि विराट कोहली ५ धावांवर बाद झाले. ६ महिन्यांनंतर एकत्र आलेल्या ‘रो-को’ जोडीने फॅन्सना निराश केले.

Rohit Sharma and Virat Kohli failed in their first ODI
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. जवळपास सहा महिन्यांनंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी दोघांनाही स्वस्तात बाद करत भारताची सुरुवातच डळमळीत केली. रोहितने २१ चेंडूत ११ धावा केल्या, तर विराटला अवघ्या ६ चेंडूंचा सामना करता आला आणि तो ५ धावांवर माघारी परतला. दोन्ही अनुभवी फलंदाज लवकर बाद झाल्याने भारतीय डावावर सुरुवातीलाच दबाव निर्माण झाला.

रोहित लयीत दिसलाच नाही; मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न महागात

रोहित शर्माने आपल्या खेळीत एक आकर्षक चौकार लगावला. मात्र त्यानंतर तो संपूर्ण डावात सहजतेने फलंदाजी करताना दिसला नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला सतत अचूक टप्प्यावर चेंडू टाकत बांधून ठेवले. २१ चेंडूंत केवळ ११ धावा करताना त्याचा स्ट्राइक रेट ५२.३८ इतकाच होता. सॅम करनच्या गोलंदाजीवर पुढे येत षटकार मारण्याचा प्रयत्न त्याच्यावर उलटला. चेंडू हवेत उंच गेला आणि हॅरी ब्रूकने सुरक्षित झेल घेत रोहितचा डाव संपवला.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहितच्या इनिंगवर करडी नजर, विराट-राहुलही BCCIच्या रडारवर, इंग्लंड वनडे सीरिज अग्निपरीक्षा; कॅप्टन गिल काय म्हणाला?

आर्चरच्या वेगासमोर विराटची झुंज; अवघ्या ५ धावांत खेळी संपली

आयपीएलनंतर दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर आर्चरच्या वेगवान आणि आत येणाऱ्या चेंडूसमोर तो अडचणीत सापडला. आर्चरच्या चेंडूवर विराटच्या पॅडला चेंडू लागल्यानंतर इंग्लंडने जोरदार अपील केले आणि पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू बाद दिले. विराटने केवळ ६ चेंडूंमध्ये ५ धावा केल्या आणि भारताला दुसरा मोठा धक्का बसला.

Maharashtra TimesTeam India : ‘ही टीम इंडिया नाही, मुंबईची टीम’; इंग्लंड विरुद्ध 4-0 ने व्हाईट वॉशनंतर माजी दिग्गजाने काढले वाभाडे; थेट नावेच मोजली

२०२७ विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची मालिका

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठीही इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या दोघांच्या फॉर्मकडे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष आहे.