Headlines

पंढरीच्या वाटेवर चोरांचा विळखा, उड्ड्णपुलाखाली विसावलेल्या वारकाऱ्यांना झोपेत लुबाडले| Maharashtra Times


म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: आषाढी एकादशीनिमित्त मित्राची गाडी घेऊन मोठ्या पंढरपूरकडे जात प्रवासी सिडको उड्डाणपुलाखाली थांबले. गाडीत प्रवासी झोपले असताना, चोरटयाने त्यांची सोन्याची अंगठी, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरीची घटना घडली. वारकऱ्याला जाग आल्याने, त्याने चोरट्यांचा पाठलाग केला. चोरटे पसार झाले. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

या प्रकरणात नारायण कारभारी बोडखे (वय ४०, रा. देभेगाव, ता. कन्नड) यांनी तक्रार दिली. बोडखे व ज्ञानेश्वर किसनराव बोडखे हे पंढरपूर आषाढी वारीसाठी एक जुलैला रात्री दुचाकीने पडेगाव येथे आले. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मित्राची स्कार्पिओ घेतली. पडेगावला निघण्यासाठी त्यांना उशिर झाला. रात्री शहरात जेवण करण्यासाठी दोघे फिरत होते. रात्री १.३० ते ३.३० या दरम्यान हॉटेल्स बंद असल्याने शेवटी दोघे कार घेऊन, सिडको बसस्थानकाजवळील एका टपरीवर आले. तेथे पोहे खाऊन या दोघांनी चहा घेतला. कन्नड ते पडेगाव आणि पडेगाव ते सिडको असा प्रवास झाल्याने दोघे कार सिडको उड्डाणपुलाखाली लावून, गाडीत काही वेळेसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गाडी लावली.
Maharashtra TimesAshadhi Wari: वारकऱ्यांना कोयता दाखवत लुटलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पंढरपूरला जाताना दौंडमध्ये भीषण घटना
नारायण हे समोरील आसनावर व ज्ञानेश्वर चालकाच्या आसनावर झोपले. या दोघांना झोप लागल्यानंतर सुमारे पहाटे ४.३० वाजता नारायण यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी कोणीतरी ओढत असल्याची जाणीव झाल्याने ते जागे झाले. साखळी ओढून अंदाजे २८ ते ३० वर्षांचा एक व्यक्ती, त्यांच्या जवळून पळत जाताना दिसला. बोडखे यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र चोरटा अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला. त्यानंतर त्यांनी गाडीत परत येऊन पाहणी केली असता, त्यांच्या गाडीतून ५० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची अंगठी, दोन मोबाइल, १० हजारांची रोख रक्कम असा सुमारे ६५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. या दोघांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार कांबळे करीत आहेत.

माऊलींच्या पालखीत पोस्टरबॉय वेधतायत लक्ष, नेमका काय दिला संदेश?

दरम्यान, श्री क्षेत्र पंढरपूर त्याचप्रमाणे शहराजवळील असलेल्या प्रतिपंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त होणारी यात्रा गर्दी खेचणारी असते. भाविकांची संख्याही अधिक असते त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत