शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्यावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. विधीमंडळ पक्षातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 (अ) चा दाखला देण्यात आला. तसेच कोर्टाला काही कागदपत्रे दाखवायची आहेत, असं सिब्बल यांनी म्हटलं. “शिवसेना पक्षाच्या घटनेत कसे बदल झाले, याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती. नेते, उपनेते कसे निवडले गेले याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती. आमच्याकडे आयोगाला दिलेली पोचबावती सुद्धा आहे”, असं कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले.
“1999 च्या घटनेत पक्षप्रमुखपद नव्हतं, हे यांना 2026 ला कळालं. निवडणूक आयोगाला जे पाहिजे होतं ते आम्ही दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले, 12 निवडून आले, तर इतर नियुक्त केले”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
“पक्षात फूट नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय हा परिशिष्ट 15 पेक्षा विसंगत आहे. निवडणूक आयोगाने विधीमंडळातील फूट ही पक्षातील फूट समजून निर्णय दिला. घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही. विधीमंडळ पक्षाचा इथे संबंधच येत नाही, तसा इथे उल्लेखच नाही”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
कोर्टाचा सवाल, कपिल सिब्बल यांचं उत्तर
“फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का?”, असा सवाल कोर्टाने केला. त्यावर “काही निवडले गेले तर काही नियुक्त केले”, असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलं. तसेच “27 तारखेच्या पत्रात निवडून आलेले नेते, नियुक्त केलेल्यांची माहिती आहे”, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. “घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. “एकनाथ शिंदे सुरत, गुवाहाटीला गेले. त्यानंतर मुख्यमंत्री झाले”, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
नेता म्हणजे काय? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर नेता हे पद पक्ष संघटनेतील आहे, असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलं. “राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचा निवडीचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो”, असं कपिल सिब्बल म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं
“तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगत आहात त्या बरोबर वाटत आहेत”, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. फूट म्हणजे नक्की काय? विधीमंडळात पडलेली फूट नंतर संघटनेत वाढत गेली, असं कोर्टाने म्हटलं. तसेच प्रतिज्ञापत्रात दोन्ही गटाकडे सदस्यसंख्या किती होती? असा सवाल कोर्टाने केला. “कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा”, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. “विधीमंडळ, राजकीय पक्षातील फूट होत राहणार, तोडगा काढणार का? आम्हाला यात ग्राउंड रिअॅलिटी बघायची आहे”, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
“तुम्ही सीएम झाल्यावर आपोआप सर्वजण तुमच्याकडे येतील”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. “शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपद दिलं”, असं कपिल सिब्बल म्हणाले. “आयोग उत्तरं शोधणार तेव्हा इतर बाबींची चौकशी करावी लागेल”, असं सुप्रीम कोर्ट म्हणालं. “आयोग म्हणालं राजकीय पक्षात फूट असावी, मग त्यांनी 2 पत्र काढली”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
‘शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड बेकायदेशीर’, सिब्बल यांचा युक्तिवाद
“कुठल्याही संघटनेची शहानिशा न करता शिंदेंनी मु्ख्यमंत्री केलं. शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची निवड बेकायदेशीर होती”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. “एकनाथ शिंदेंची मु्ख्य नेतापद निवड कायदेशीर नाही”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
ठाकरेंकडे संघटनेचं पाठबळ, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
“शिवसेना ही संघटना कायम ठाकरेंकडेच होती. नेते, उपनेते, सचिव यांच्यासह सर्व संघटना ठाकरेंकडे आहे. पूर्वी एकनाथ शिंदेंना्ा घटना योग्य वाटायची. नंतर म्हणतात दोषपूर्ण. आमच्या संघटना पाठबळाकडे बघा. संघटनेत आम्ही कैकपटीने पुढे आहोत”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा