Headlines

Washim News : बोलेरो पिकअपच्या धडकेमुळे भीषण अपघात, दुचाकींना उडवले; दोन कुटुंबांचा आधार हरपला – washim news road accident happen in darhava as bolero pickup clash with bikes two died


वाशिम : वाशिममधील दारव्हा येथे भीषण अपघात घडला आहे. भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दारव्हा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळ ही घटना घडली.

वृत्तानुसार, नाना जयसिंगपूरे वय ५६, रा. खरडगाव, यवतमाळ, सुभाष किसन चव्हाण वय ५५, रा. शिक्षक कॉलनी कारंजा, यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत. नाना जयसिंगपूरे हे दुचाकीने पत्नी जया यांच्यासोबत तेरवीच्या कार्यक्रमासाठी नेर च्या दिशेने निघाले होते. तर सुभाष चव्हाण हे दुचाकीने शेतातील काम आटोपून प्रभू राठोड यांच्या समवेत कारंजाच्या दिशेने येत होते. पण दोन्हीही दुचाकींना दारव्हा रस्ता हा जीवघेणा ठरला आहे.

दारव्हाकडून येणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअपने (एमएच २९ बी ७६८) दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. रस्त्यावरील प्रवाशांनी या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींना दिली. विनोद खोंड यांनी स्वतःच्या स्वतःच्या रुग्णाहिकेतून अपघातग्रस्तांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. पण डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, जखमींमधील प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. तर जया जयसिंगपुरे यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेनंतर बोलेरो पिकअपचा चालक वाहन जागेवर सोडून पसार झाला आहे. घटनेचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे. या घटनेतील मृतक सुभाष चव्हाण हे रामगाव रामेश्वर दारव्हा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांच्या पत्नी विजया ह्या ग्रामसेविका म्हणून काम करत होत्या. तसेच नाना जयसिंगपूरे हे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मुरंबी कारंजा येथे काम करत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत