Headlines

US attack Iran Chabahar Port India Setback; होर्मुझ, खार्ग बेटानंतर अमेरिकेने चाबहार पोर्टकडे मोर्चा वळवला; भारताचे टेन्शन का वाढले? चीन-पाकिस्तानशी थेट कनेक्शन


Chabahar Port Attack: मध्य-पूर्वेतील शांततेला पुन्हा एकदा युद्धाचे ग्रहण लागले आहे. अमेरिका सतत इराणच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले करत करून तेहरानकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतासाठी सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चाबहार बंदरावरही हल्ला झाला, त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली असेल.

अमेरिकेने इराणविरोधातील आपल्या लष्करी मोहीमेची व्यक्ती आणि आक्रमकता वाढवली असून यावेळी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदराला लक्ष्य केले आहे. या इराणी बंदराशी भारताचे हितसंबंधही जोडलेले असून यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर भारत सरकार साहजिकच चिंतीत असेल. चाबहार बंदराच्या माध्यमातून भारत थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये पोहोचतो, पण अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे भारताच्या योजनांना खीळ बसू शकते. मात्र, चाबहार बंदरावरील हल्ल्यामुळे नुकसानीचे प्रमाण प्रत्यक्ष पाहणीनंतरच कळू शकेल.

Maharashtra TimesPF Interest Credit: 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित

भारतासाठी गेमचेंजर ‘चाबहार’ बंदर

ओमानच्या आखातातील मुखाशी वसलेले चाबहार बंदर इराणचे पहिले खोल पाण्यातील बंदर असून भारत 2002 पासून या प्रकल्पाशी जोडलेला आहे आणि 2016 मध्ये भारत, इराण व अफगाणिस्तान यांच्यातील त्रिपक्षीय करारानंतर या बंदराच्या विकासाला गती मिळाली. भारताने आतापर्यंत या प्रकल्पात 120 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून 2017 मध्ये याच बंदरातून अफगाणिस्तानला गव्हाची पहिली खेप पाठवलेली.

दुसरीकडे चाबहार बंदराचे केवळ व्यापारिक महत्त्व नाही तर, पाकिस्तानचे ग्वादर बंदर, जे चीनने विकसित केले आहे, मध्य-पूर्वेतील ड्रॅगनच्या सामरिक उपस्थितीचे प्रमुख केंद्र मानले जाते. अशाप्रकारे, या बंदरामुळे भारताला पश्चिम आशियात संतुलन साधण्याची आणि चीन-पाकिस्तानच्या वाढत्या सागरी धोरणाला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळते. त्यामुळे, या बंदरावरील कोणत्याही संकटाचा भारताच्या सामरिक स्थानावर परिणाम होऊ शकतो.

Maharashtra TimesRobert Kiyosaki: तुमचे पैसे बुडणार? ‘इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार’; म्युच्युअल फंड, ETF गुंतवणूकदारांना कियोसाकीचा इशारा

पाकिस्तानला डावलण्याचा सर्वात महत्तवाचा सागरीमार्ग

या इराणी बंदरामुळे भारताला पाकिस्तानी सीमा ओलांडल्याशिवाय अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियापर्यंत व्यापार करणे शक्य झाले आहे. तसेच चाबहार बंदर भारताच्या कनेक्टिव्हिटी धोरणाचा महत्त्वाचा घटक असून आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर – INSTC ला देखील जोडलेले आहे, जो इराणमार्गे भारताला मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी जोडतो.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर चाबहार बंदराची स्थिती काय?

इराणच्या या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदरावर अमेरिकेच्या अलीकडच्या हल्ल्यानंतर भारत सरकारची नक्कीच चिंता वाढली असेल, पण बंदराचे नेमके किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच नुकसानीचे खरे मूल्यांकन करणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले.

सामरिक आणि आर्थिक आघाडीवर भारतासाठी चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सागरीमार्गातून भारत व्यापार, मानवतावादी मदत आणि प्रादेशिक संपर्क वाढवत आहे, तुपामुळे बंदराचे कोणतेही मोठे नुकसान झाल्यास भारताच्या प्रादेशिक संपर्क आणि व्यापारी हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.

भारताच्या दीर्घकालीन धोरणाला फटका

या बंदरानजीक सतत वाढणाऱ्या लष्करी तणावामुळे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक योजनांना आव्हान निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला आणि त्याचा परिणाम पश्चिम आशियातील गुंतवणूक, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांवर होईल. अशा परिस्थितीत, भारताचे मध्य आशियाई प्रवेश मार्ग, INSTC प्रकल्प आणि चीनच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करण्याच्या धोरणाला धक्का बसू शकतो. त्यामुळे सरकारचे चाबहारशी संबंधित सर्व घडामोडीवार बारीक लक्ष असेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत