Headlines

Pune Railway Division to Start Special Trains for Ashadhi Ekadashi from July 22 to 29; विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?


Ashadhi Ekadashi Pune Railway Division Extra Trains : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय केली आहे.

Ashadhi Ekadashi Pune Railway Division Extra Trains
आषाढी एकादशी मध्ये रेल्वेच्या जादा ट्रेन्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाने आषाढीसाठी पुणे-मिरज गाडी २३ ते २९ जुलै दरम्यान दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ८.४० वाजता सुटेल. ती सायंकाळी पावणेसात वाजता मिरज येथे पोहोचेल. मिरज येथून पुण्यासाठी रात्री साडेनऊ वाजता रेल्वे सुटणार आहे. या गाडीला हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासुद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालागाव, लंगरपेठ, कठवे महांकाळ, सालगरे असे थांबे राहणार आहेत.

पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये नागपूर-मिरज (४ फेऱ्या), नवीन अमरावती-पंढरपूर (४), खामगाव-पंढरपूर (४) आणि लातूर-पंढरपूर (८) अशा एकूण २० फेऱ्यांचा समावेश आहे. या गाड्यांना दौंड, कुर्डूवाडी, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, पंढरपूर यांसह विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
Maharashtra TimesNagpur News : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे
अनारक्षित विशेष गाड्यांमध्ये भुसावळ-पंढरपूर (४), कोल्हापूर-कुर्डूवाडी (१६) आणि पुणे-मिरज (१४) अशा एकूण ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. आरक्षित विशेष गाड्यांचे आरक्षण एक जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर; तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकीट ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे, ॲपद्वारे मिळेल.

दिंड्यांना मिळणार २० हजारांचे अनुदान

आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांमधील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान यंदाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश सरकारने गुरुवारी (दोन जुलै) जारी केला आहे.
Maharashtra TimesNashik News : वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने
दिंड्यांना अनुदान देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून, त्याचा लाभ सुमारे एक हजार ४०० दिंड्यांना होणार आहे. त्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात. दुखापतग्रस्त होतात. एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत काहींचा मृत्यूही होतो; तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही.

विशेष सहाय्य विभागाकडून अनुदान जाहीर

अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडण्यास मदत होईल, अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत होती. या विनंतीला मान देऊन सरकारने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. मागील वर्षी काहीसा विलंब झाला. मात्र, अनुदान वितरित करण्यात आले होते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुदान जाहीर केले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा