Headlines

IMD weather alert heavy rain forecast for konkan what will be the situation in mumbai pune; पाऊस पुन्हा राज्याला झोडपणार! कोकणात मुसळधार बरसणार, मुंबई-पुण्यात कशी असणार स्थिती? ताजा हवामान अंदाज


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई क्षेत्रामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मान्सून सक्रिय राहिल्याने याचा फायदा एकूण पाऊसमानासाठी झाला आहे. ‘एल निनो’ असतानाही काही दिवस मुसळधार उपस्थितीमुळे मुंबई क्षेत्रात पावसाची सरासरी गाठण्यासाठी मदत झाली. कुलाबा येथे ऑगस्टपर्यंतची सरासरी पार झाली असून, सांताक्रूझ येथे सप्टेंबर अखेरपर्यंतची सरासरी गाठण्यासाठी सुमारे १०० मिलीमीटर पावसाची गरज आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार हे दोन्ही आठवडे मान्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

कुलाबा येथे १ जूनपासून १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत यंदाचे एकूण पाऊसमान १७२५.२ मिलीमीटर नोंदले गेले. कुलाबा येथे ऑगस्टअखेरपर्यंत १७१६.८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो, तर सांताक्रूझ येथे २१०१.९ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. सप्टेंबरअखेरपर्यंत सांताक्रूझ येथे २२०५.८ मिलीमीटर पावसाची नोंद होते. त्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंतची सरासरी गाठण्यासाठी आता सुमारे १०४ मिलीमीटर पावसाची गरज आहे. येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत कोकण किनारपट्टीवर सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे.

पावसाबाबत काय आहे अंदाज?

२० ते २७ ऑगस्ट या कालावधीतही कोकण किनारपट्टीवर सरासरीहून अधिक पाऊस पडेल. त्यामुळे सांताक्रूझ येथील सप्टेंबरअखेरपर्यंतची सरासरी गाठायला या पावसाची मदत होऊ शकेल. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, ते येत्या २४ तासांमध्ये झारखंड ओलांडून वायव्य दिशेने प्रवास करेल. त्यानंतर याची तीव्रता कमी होईल; मात्र याचा प्रवास वायव्य दिशेने होत राहील. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणारे वारे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांवर पसरले आहे, त्यातून निर्माण झालेल्या चक्रीय वातस्थितीतून संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पुढचे तीन दिवस पुण्यात रिमझिम

पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत. घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाल्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. परिणामी कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. घाटमाथ्यावरही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. गुरुवारीदेखील शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नऊच्या सुमारास मध्यवर्ती पुण्यासह उपनगरात मोठी सर आली. तासाभरानंतर पुन्हा ऊन पडले होते. दुपारनंतर वारा सुटला होता. दिवसभरात १.३ मिलिमीटर पाऊस पडला, कमाल २८.४ आणि किमान २२.१ अंश सेल्सिअस तापमान होते.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत