कंटेनर–बसचा, भीषण अपघात; १५ जण जखमीकोंडाईबारी घाटात थरार, बसचा पुढील भाग चक्काचूर
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील. नंदुरबार: नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकी परिसरात उभ्या असलेल्या नवापूर आगाराच्या बसला कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक, वाहकासह एकूण १५ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघाताचे दृश्य अत्यंत अंगावर शहारे आणणारे होते.
सुरत धुळे महामार्गावरून नवापूर आगाराची पुणे नवापूर बस उभी होती. 1 फेब्रुवारी रात्री 9 वाजे दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने उभ्या बसला ( क्र.एम एच 14 ,1957 ) जोरदार धडक दिली.दरम्यान बस च्या पुढे असलेल्या ट्रक व कंटेनर अशा दोन वाहनाच्या मध्ये बस फसली. पुढील ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. लोखंडी पत्रे वाकडी-तिडकी झाली
अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित यांचे पाय केबिनमध्ये अडकले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले. बस वाहक संतोष बारसू सोंडे यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, जामनपाडा येथील मनोहर जयवंत गावित यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये एकूण १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये नवापूर तालुका, चिंचपाडा, नवापूर शहर, साक्री तालुका तसेच सुरत, दहिवेल आणि सटाणा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल होऊन मदतकार्य राबवण्यात आले. या भीषण अपघाताचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा