Headlines

ajinkya rahane retirement wife radhika shares parents emotional letter ; तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र


Ajinkya Rahane Parents Emotional Letter: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाला भिडणारे हे शब्द आहेत.

ajinkya rahane retirement parents emotional letter
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे अजिंक्यने आपल्या या निर्णयाची माहिती दिल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, अजिंक्यच्या या निर्णयावर त्याच्या पालकांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकर-रहाणे हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अजिंक्यच्या आई-वडिलांनी त्याला लिहिलेले एक अत्यंत भावूक पत्र शेअर करून ही प्रतिक्रिया समोर आणली आहे.

राधिकाने या पत्रासोबत एक खास माहितीही जोडली आहे. तिने लिहिले आहे की, “३० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अजिंक्यने हातात बॅट घेत एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात केली होती. आज त्याच दिवशी तो खेळाचा निरोप घेत असताना, त्याच्या वडिलांनी प्रेम, अभिमान आणि आठवणींनी भरलेले हे पत्र लिहिले आहे. काही क्षण खरोखरच वर्तुळ पूर्ण करतात.”

Maharashtra TimesMrunal Yashasvi Dating : मृणाल ठाकूरला डेट करतोय यशस्वी जयस्वाल? एका व्हिडिओने रंगलेल्या चर्चांमागचं सत्य काय?

“तुझा निवृत्तीचा फोन मन हेलावून गेला…”

अजिंक्यच्या आई-वडिलांनी पत्रात त्याच्या बालपणापासूनच्या खडतर प्रवासाला उजाळा दिला आहे. पत्रात त्यांनी लिहिले, “तुझा निवृत्तीचा फोन मन हेलावून गेला. १९९६-९७ मध्ये तुला डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर दाखल केल्यापासूनचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. कोणत्याही सुविधा, साधने व पाठींबा नसतानाही तुझी इथपर्यंतची वाटचाल थक्क करणारी होती. अनेक चढ-उतार आले, पण तू खचला नाहीस, उलट तावून सुलाखून निघालास आणि देशाचे यशस्वी नेतृत्व केलेस.”

Ajinkya Rahane Retirement

जगाने कौतुक केले नसले तरी तूच आमचा खरा हिरो!

पालकांनी पुढे लिहिले की, “आमच्या दृष्टीने तुझ्या यशापयशाच्या गोळाबेरजेपेक्षा तुझा साधेपणा, जमिनीवर असणे, खेळाशी व देशाशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुझे निष्कलंक क्रिकेट हेच महत्त्वाचे आहे. जगाने जरी तुझे जास्त गोडवे गायले नसले तरीही तूच आमचा खरा हिरो आहेस.”

Maharashtra TimesPakistan Cricket Team : वेस्ट इंडिजकडून नामुष्कीनंतर पाकिस्तानला ICC चाही दणका; दोन खेळाडूंवर मोठी कारवाई, काय घडलं होतं?

शेवटी हितचिंतक, प्रशिक्षक व सहकाऱ्यांचे ऋण कायम मनात ठेवण्याचा सल्ला देत, पालकांनी त्याला आयुष्याच्या दुसऱ्या पर्वासाठी ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. पालकांचे हे भावूक पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.