Harry Brook News : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ६ विकेटने विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये शुभमन ८० धावा, अक्षर पटेल नाबाद ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावा केल्या. मात्र पराभवानंतर हॅरी ब्रुक काय म्हणाला जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदरचे संयमी अर्धशतक या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध सहा विकेटनी मात केली. या विजयासह भारताने इंग्लंड दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित केली. या सामन्यात शुभमन गिल ८० धावा करून रिटायर हर्ट झाला होता. अक्षर पटेलने चार विकेट आणि नाबाद ५७ धावा केल्या. तर वॉशिंग्टननेही नाबाद ५२ धावा करत सामना जिंकवला. पण इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने सामना कुठे फिरला हे सांगितले.
पहिल्या वनडेमधील पराभवानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने सांगितले की, कामगिरी फारशी चांगली नव्हती. मधल्या फळीत २० धावांत ५ विकेट गेल्यामुळे संघ दबावात आला, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी चांगली लढत दिली आणि रूट आणि लियान डॉसन यांच्या भागीदारीच्या जोरावर संघ २६०पर्यंत पोहोचला. पिचनंतर थोडी स्लो झाली ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला ५-६च्या रनरेटने सहज सामना जिंकता आला. त्यांनी सांगितले की जर अजून काही धावा झाल्या असत्या तर स्पिनर्स मधल्या षटकांमध्ये प्रभाव टाकू शकले असते. पुढील सामन्यासाठी ते कार्डिफला जाऊन पिच बघून संघ निवडीचा निर्णय घेतील आणि अधिक ताकदीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू, असं हॅरी ब्रुक म्हणाला. भारताकडून गुरूनूर ब्रार २, प्रसिद्ध कृष्णा २ आणि बुमराह १ यांनी घेतलेल्या पाच विकेटमुळे इंग्लंड बॅकफूटवर गेली. Rohit Sharma Virat Kohli : बर्मिंगहॅममध्ये रो-को फ्लॉप! 6 महिन्यांनंतर मैदानात उतरुनही निराशाजनक कामगिरी; रोहित-विराट नेमके कसे आऊट झाले? ‘टी-२०’ मालिकेत अपयश आलेल्या भारताने वन-डेत साजेशी सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून इंग्लंडचा डाव ४७.५ षटकांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य ४५.२ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली अपयशी ठरले. गिलने श्रेयस अय्यरसह १०३ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी रचली. शतकाजवळ आल्यावर गिल पायात गोळे आल्यामुळे निवृत्त झाला. त्याने ७५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ८० धावा केल्या. अक्षरने वॉशिंग्टन सुंदरसह १०५ चेंडूंत १०२ धावांची अभेद्य भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. IND vs ENG 1st ODI : भारताला जिंकण्यासाठी 259 धावांचे टार्गेट, 80-5 वरून इंग्लंडचे कमबॅक, शिवम दुबेची एक चूक पडली महागात, नेमकी काय? दरम्यान, अक्षरने ५२ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद ५७, तर वॉशिंग्टन सुंदरने ६३ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. लिअॅम डॉसन आणि जो रूटने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा