Headlines

Pune moshi building collapse injury victims face charges questions raised on political leaders; धक्कादायक! मोशीतील दुर्घटनेप्रकरणी जखमींवरच गुन्हा दाखल; राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी लाजीरवाणी भूमिका


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड: मोशीतील कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी बड्या माशांना अभय देण्यात आल्याचे मंगळवारी दिसले. या दुर्घटनेचे खापर त्याच अपघातात जखमी झालेले प्रकल्पप्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या कर्मचाऱ्यांवर फोडण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीचे मालक, मुख्य ठेकेदार आणि कंपनीतील निष्क्रिय भागीदार (स्लीपिंग पार्टनर) असणारी राजकीय व्यक्ती यांची नावे कुठेही समोर आणलेली नाहीत. परिणामी, महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन मधुकर निकम यांनी या प्रकरणी सोमवारी (१३ जुलै) रात्री उशिरा भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे प्रकल्पप्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९), सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) या दोघांवर नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा आणि १२ कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आरोपी विजय सपकाळ कचरा डेपो दुर्घटनेत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार आहे.

प्रकल्प कंत्राटदार अँटोनी लॉरा कंपनीत शहरातील एका आमदाराच्या कुटुंबातील महिला, महापालिकेतील अधिकाऱ्याची पत्नी आणि पुण्यातील एका दिवंगत नेत्याचा मुलगा निष्क्रिय भागीदार असल्याची चर्चा आहे. महापालिकेतील अनेक अधिकारी, राजकीय मंडळींनी ही गोष्ट खासगीत मान्य केली आहे. हा नेताच सध्या कचरा डेपोतील सर्व टेंडर पाहतो. तरीही नऊ लोकांच्या मृत्यूचे खापर कंपनीतील जखमी कामगारांवर फोडण्यात आले आहे.

दरम्यान, “महापालिकेच्या दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता आणि सपकाळ यांच्यावर प्रकल्पाची मुख्य जबाबदारी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोककुमार गुप्ताला अटक केली आहे,” अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांच्याकडून देण्यात आली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत