”काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन मोदी यांनी दिले होते. पण त्याच अदानी व अंबानींचा काळा पैसा त्यांनी आतापर्यंत वापरला आहे व आता ते राहुल गांधींना हा पैसा दिल्याचे सांगतात म्हणजे मोदींना अदाणी-अंबानींचा भ्रष्टाचारी व्यवहार माहीत आहे. त्यामुळे ईडीने मोदींचे स्टेटमेंट घ्यावे व कालचे त्यांचे जे यासंदर्भातील स्टेटमेंट आहे, तेच ग्राह्य मानून मनीलाँड्रिंग कायद्यानुसार त्या दोन्ही उद्योजकांवर कारवाई करत त्यांना अटक करावी”.अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

अदाणी व अंबानी यांनी दोन टेम्पो भरून पैसे राहुल गांधींना दिल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. यावर भाष्य करताना राऊत हे बुधवारी सायंकाळी क्लेरा ब्रुस मैदानावर झालेल्या सभेत म्हणाले होते की, ”यासारखा दुसरा विनोद नाही”. त्यानंतर गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यावर म्हणाले, ” काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन मोदी यांनी दिले होते. पण त्याच अदानी व अंबानींचा काळा पैसा त्यांनी आतापर्यंत वापरला आहे व आता ते राहुल गांधींना हा पैसा दिल्याचे सांगतात म्हणजे मोदींना अदाणी-अंबानींचा भ्रष्टाचारी व्यवहार माहीत आहे. त्यामुळे ईडीने मोदींचे स्टेटमेंट घ्यावे व कालचे त्यांचे जे यासंदर्भातील स्टेटमेंट आहे, तेच ग्राह्य मानून मनीलाँड्रिंग कायद्यानुसार त्या दोन्ही उद्योजकांवर कारवाई करत त्यांना अटक करावी”.अशी मागणी राऊत यांनी केली आहे. तसेच अशा वक्तव्यातून मोदींचे मानसिक आरोग्य बिघडले असल्याने त्यांच्या या लाडक्या नेत्यावर भाजपने आता उपचार करावेत, असेही राऊत यांनी म्हंटलं आहे.
थोरात दिवसा मातोश्री, सायंकाळी सिल्वर ओक, रात्री भाजपसह; लवकरच कमळ हाती, बड्या नेत्याचा दावा
शिंदे व अजित पवारांचा पक्ष तडीपार करणार
मोदी व शहा हे नेहमी खोटे बोलतात व त्यांच्यासमवेत जाणार्यांनाही हा रोग जडला आहे, असा दावा करून राऊत म्हणाले, ”४ जूननंतर एकनाथ शिंदेंचा व अजितदादांचा पक्ष राहणार नाही. आम्ही हे दोन्ही पक्ष तडीपार करणार आहोत. पण मोदी-शहांसमवेत राहून त्यांना खोटे बोलण्याचा रोग झाला आहे. खोटे बोलणे हेच त्यांचे मोठे क्वालिफिकेशन आहे”, असा दावाही राऊत यांनी केला. दरम्यान, राम मंदिराचे कुलूप काँग्रेसचे राजीव गांधी यांनी उघडले होते, याचे भान भाजपवाल्यांनी ठेवावे तसेच अमित शहा इंडिया आघाडीत आले तर त्यांना पंतप्रधान करायला आम्ही तयार आहोत, असे भाष्यही राऊत यांनी केले.

