Headlines

ZP Election Result 2026: मोदींनी ३९९ चा जुगाड लावलाय, ४०० वी मी! भाषण ऐकून दादाही चपापले; अर्चना पाटील हरल्या की जिंकल्या?


ZP Election Result 2026: भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला आहे. याआधी पाटील लोकसभेला पराभूत झाल्या होत्या.

archana patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. विरोधी पक्षांची पिछेहाट सुरुच आहे. धाराशिवच्या तेरामधून भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील २३६० मतांनी विजयी झाल्या आहेत. तिरंगी लढतीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अर्चना पाटील यांच्या समोर शिवसेना उबाठाच्या किर्तीमाला खटावकर यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर तिसऱ्या स्थानी राहिल्या. धाराशिवच्या तेर गटातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आमदार जगजीतसिंह पाटील विरुद्ध शिवसेना उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
Maharashtra TimesSharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती बिघडली; घशाला संसर्ग झाल्यानं पुण्यातील रुग्णालयाकडे रवाना
अर्चना पाटील यांनी २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या. कारण धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली होती. या निवडणुकीतील प्रचार चांगलाच गाजला होता. त्यावेळी भाजपनं ४०० पारचा नारा दिला होता. अर्चना पाटील यांनी अब की बार ४०० पारचा धागा पकडत आपल्याला विजयी करुन दिल्लीला पाठवण्याचं आवाहन मतदारांना केलं होतं. या निवडणुकीत पाटील यांचा ठाकरेसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला होता.

अर्चना पाटील यांचं प्रचारसभेतील एक भाषण बरंच गाजलं होतं. या भाषणातील त्यांच्या एका विधानाची क्लिप सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली. पंतप्रधान मोदींनी ४०० पारचा नारा दिलाय. ३९९ चा जुगाड त्यांनी लावलाय, ४०० वी मी आहे, असं अर्चना पाटील प्रचार सभेतील भाषणात म्हणाल्या होत्या.

अर्चना पाटील भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या शेजारीच उभे होते. तर पाटील यांचे पती राणा जगजीतसिंह मागे उभे होते. अर्चना पाटील यांनी ४०० च्या जुगाडावरुन केलेलं विधान ऐकताच अजित पवार चपापले. त्यांनी मागे उभ्या असलेल्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि गालातल्या गालात हसले. त्यावर पाटील यांनीही स्मित हास्य केलं होतं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा