Wardha Water Crisis: तब्बल ६० वर्षांनंतरही प्रस्तावातील तलाव प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांना ड्रमभर पाण्यासाठी तीनशे रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

पाचशे लोकवस्तीच्या चामला गावात दोन विहिरी आहेत. पाणीपुरवठा योजनेतील टाकीदेखील आहे. एका विहिरीत शेजारच्या माडेगाव येथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाते. हे पाणी विहिरीत सोडून गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी आठवड्यातून काही मिनिटांसाठी येत असल्याने अडचण वाढते. आजवर शेतातील विहिरींतील पाण्यावर तहान भागविली जात होती. पण, या विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. काही विहिरींना पाणी असले तरी शेतकऱ्यांकडून वापराची परवानगी देण्यात येत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. दूरवर या विहिरी असल्याने बैलगाडीवरून ड्रमद्वारे हे पाणी आणले जाते. यासाठी सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांचा खर्च गावकऱ्यांना करावा लागत आहे. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. भीषण परिस्थिती असतानाही पाणीटंचाई निवारणासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. बोरखेडी, थार या गावांतही याहून वेगळी परिस्थिती नाही.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १५ मेपर्यंत ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांत ही परिस्थिती बदललेली नाही. महिलांच्या डोक्यावर हंडा, तरुणांच्या मोटारसायकलवर पाण्याच्या कॅन तर वृद्धांच्या हातात पाण्याच्या बादल्या नजरेस पडतात. सकाळ, सायंकाळी पाण्यासाठी परिसरात त्यांची धडपड सुरू असते. माणसांसाठी पाणी मिळत नसताना जनावरांसाठी कुठून आणायचे हा गावकऱ्यांसमोरील प्रश्न आहे. या समस्येला कंटाळून अनेक युवांनी गाव सोडले. पाणीप्रश्नाची धग पटवून देण्यासाठी गावकऱ्यांनी निवेदने दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार, खासदारांनाही गळ घातली. नागपुरातील प्रत्येक हिवाळी अधिवेशनात गावकरी मंत्र्यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मांडला. तरीही समस्या सुटलेली नाही. केवळ आश्वासने देण्यात आली, अशी व्यथा ग्रामपंचायत सदस्य मधुकर मुकादम यांनी मांडली.
Ants Smuggling: मुंग्यांची चक्क टेस्ट ट्यूबमधून तस्करी; परदेशी नागरिकांना ५००० मुंग्यांसह अटक
अकोला मनपात तोडफोड
अकोला शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यावरून संतप्त नागरिकांनी शिवसेना (उबाठा) चे नेते मंगेश काळे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक दिली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपाच्या जलप्रदाय विभागात तोडफोड करून संताप व्यक्त केला. महिलांनी सोबत आणलेले माठ व घागरीसुद्धा जलप्रदाय विभागाच्या अभियंत्याच्या केबिनमध्ये फोडल्या.

