नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगर परिषदांच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. नंदुरबारमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. इथे दोन नगर परिषदांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर नंदुरबार नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा विजय झालाय. तर शहादा नगर परिषदेत अटीतटीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील विजयी झाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला बघायला मिळत आहे. खरंतर निवडणुकीच्या प्रचारापासूनच विरोधक फार ताकद लावताना दिसत नव्हते. प्रचारातही तेवढी अपेक्षित ताकद लावलेली बघायला मिळत नव्हती. अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सुप्त संघर्ष असलेला बघायला मिळाला होता. काही अपवादात्मक ठिकाणी महायुती एकत्र लढताना बघायला मिळाली होती. पण अनेक ठिकाणी महायुतीतच राजकीय मारामारी सुरु होती. अखेर महायुतीमधील संघर्षाचा निकाल आज समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही चारही नगर परिषदांमध्ये महायुतीच्या घटकपक्षांमध्ये संघर्ष बघायला मिळाला होता. आता कुठल्या नगर परिषदेत कुणाचा विजय झाला? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत राज्यभरात भाजपला चांगलं यश मिळताना दिसत आहे.288 नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजप जवळपास 120 ठिकाणी विजयी होताना दिसत आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा नंबर लागतो. शिवसेना जवळपास 60 ठिकाणी विजयी होताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी देखील जवळपास 35 ते 40 जागांवर विजयाच्या उंबरठ्यावर आहे. असं असलं तरी नंदुरबार जिल्ह्यात राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा दारुण पराभव झाला आहे. इथे चारही नगर परिषदांमध्ये भाजपचा एकही नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. नंदुरबारमधील नगर परिषदांचा सविस्तर निकाल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नंदुरबार नगर परिषदेत काय घडलं?
नंदुरबार नगर परिषदेची निवडणूक ही पहिल्या दिवसापासून चर्चेत होती. खरंतर या नगर परिषदेत गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या उमेदवार होत्या. पण त्यांना भाजपकडून चॅलेंज देण्यात आलं होतं. भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी या निवडणुकीत ताकद लावली होती. भाजपकडून या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असलेल्या अविनाश माळी यांना उमेदवारी देण्यात आली होती.
या निवडणुकीत ठाकरे गटाकडून संगीता माळी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर अपक्ष म्हणून फारुख कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे चौरंगी लढत होती. तरीही खरी लढत ही शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होती. या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना त्यांच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधक शिरीष चौधरी यांनी पाठिंबा दिला होता. कारण शिरीष चौधरी हे पूर्वी भाजपात होते. ते भाजपचे अमळनेरचे आमदार होते. दरम्यान, शिरीष चौधरी यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे रघुवंशी यांची ताकद वाढली होती. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. तसेच चंद्रकांत रघुवंशी यांचे विरोधक असलेले विक्रांत मोरे यांनीगी शिवसेनेसोबत जुळवून घेतलं होतं.
चंद्रकांत रघुवंशी यांना सर्वच स्तरातून एवढा पाठिंबा मिळत होता तर दुसरीकडे भाजपचे आमदार विजकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित या ताकदीने प्रचार करत होत्या. पण या निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचा मोठा विजय झाला आहे. नंदुरबार नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे 29, भाजपचे 8 आणि एमआयएमचे 4 उमेदवार जिंकून आले आहेत.
शहादा नगर परिषदेत काय झालं?
शहादा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण शहरात 38 टक्के जनता ही मुस्लीम समाजाचे मतदार आहेत. त्यामुळे ही मते जर एकाच ठिकाणी पडली तर मोठा उलटफेर होणार, अशी चर्चा होती. पण या ठिकाणी मतांचं धुर्वीकरण झालं आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार होते. त्यापैकी 4 उमेदवार हे मुस्लीम समुदायाचे होते. पण या निवडणुकीत खरी लढत ही भाजपचे उमेदवार मकरंद पाटील आणि जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाली. शेवटपर्यंत या ठिकाणी चुरस बघायला मिळाली. अखेर या निवडणुकीत अभिजीत पाटील यांचा 1041 मतांनी विजय झाला. या निकालामुळे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी मोठा धक्का बसला आहे.
नवापूर नगर परिषदेत काय झालं?
नवापूर नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयवंत जाधव यांचा तब्बल 9153 इतक्या घवघवीत मतांनी विजय झाला आहे. इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 20 उमेदवार विजयी झाले आबेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर यश मिळवून समाधान मानावे लागले आहे.
तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल काय?
तळोदा नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी या सातव्या फेरी अंती 3428 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय आणि भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे.
तळोद्याचा प्रभाग निहाय विजयी उमेदवार : प्रभाग 1
राष्ट्रवादी – रामानंद ठाकरे
राष्ट्रवादी – भाग्यश्री चौधरी
प्रभाग 2
शिवसेना – अनिता परदेशी
राष्ट्रवादी – शीतल लक्ष्मण पाडवी
राष्ट्रवादी – इम्रान मेहमूद खाटीक
प्रभाग 3
भाजप – अजय परदेशी
भाजप – जयश्री महाले
प्रभाग 4
शिवसेना – नदीम भगवान
राष्ट्रवादी – प्रतिभा पाडवी
प्रभाग 5
शिवसेना – जितेंद्र दुबे
राष्ट्रवादी – कल्पेश चौधरी
प्रभाग 6
राष्ट्रवादी – हर्षाबाई पाडवी
राष्ट्रवादी – गायत्री पिंपरे
प्रभाग 7
भाजप – शिरीष माळी
भाजप – रत्ना चौधरी
प्रभाग 8
शिवसेना – अनुप उदासी
राष्ट्रवादी – लक्ष्मी नाईक
प्रभाग 9
शिवसेना – कपिल कर्णकार
शिवसेना – मोनिका माळी
प्रभाग 10
राष्ट्रवादी – अरविंद बबन प्रधान
राष्ट्रवादी – मीराबाई राजू कोळी
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा