Headlines

अवैध आश्रमावर कारवाई; चालकांवर गुन्हा दाखल, सुटका केलेली दोन मुले बालगृहात| Maharashtra Times


Nagpur Illegal Ashram Update:नागपूरमध्ये बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एका अवैध आश्रमाचा पर्दाफाश ‘मटा’ने केला. नोंदणी प्रमाणपत्र नसताना, अनाथ मुलांच्या नावे पैसे उकळणाऱ्या आश्रमचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या मुलांना बालगृहात पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

प्रवीण लोणकर, नागपूर : बाल न्याय अधिनियमानुसार आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसणाऱ्या आणि अनाथ मुलांच्या नावे लोकांकडून पैसे उकळणाऱ्या अवैध आश्रमचालकांवर अखेर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम ४२ नुसार त्यांना हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘मटा’ने जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चमूची मदत घेऊन रविवारी या आश्रमाचा भंडाफोड केला होता.

अशोकनगर येथील श्री अनाथ सेवा आश्रमचे व्यवस्थापक राजू शर्मा (वय ५५) आणि कोषाध्यक्ष राजेश पाटील (वय ५५) हे आरोपी आहेत. चाइल्ड लाइनच्या समुपदेशक मंगला टेंभुर्णे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra Timesनागपुरात अवैध आश्रमाचा भांडाफोड; यादीत १६ मुलांची नोंद, सापडले दोन, बाकीची मुले कुठं गेली?

अशी झाली पोलखोल

आमचा आश्रम खूप जुना असल्याचे सांगून ‘श्री अनाथ सेवा आश्रम’ या नावाने लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी एजंट ठेवले होते. घरोघरी फिरून ते अनाथ मुलांचा संदर्भ देऊन पैसे गोळा करू लागले. संवेदनशील मनाच्या नागरिकांनी अनाथ मुलांना मदत करणे पुण्याचे काम आहे, असे समजून मदतही केली. एजंटच्या रजिस्टरमध्ये याची नोंद असल्याचेही आढळून आले. हिंगणा, बुटीबोरी, सेमिनरी हिल्स, खडगाव रोड अशा शहराच्या वेगवेगळ्या भागांतील नागरिकांनी ही मदत केली.

एजंटकडे असलेल्या पत्रकात ‘अनाथ निराश्रित’ असा स्पष्ट उल्लेख आहे. हे पत्रकही ‘मटा’च्या हाती लागले. यात मदतीसाठी पॅकेजच तयार करण्यात आले होते. ‘मटा’ चमूने या आश्रमाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी आश्रमात मदत देण्याचे कारण पुढे करून प्रवेश केला. येथे १६ अल्पवयीन मुले असून त्यातील काही अनाथ असल्याचे आश्रमातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या चमूची मदत घेऊन या आश्रमाचा भंडाफोड करण्यात आला. बाल न्याय अधिनियमानुसार आवश्यक असलेले नोंदणी प्रमाणपत्रच या संस्थेकडे नव्हते.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

सुटका केलेली मुले बालगृहात

श्री अनाथ सेवा आश्रमात आढळून आलेल्या दोन मुलांची सुटका करून जिल्हा बालकल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. या मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. मुलांच्या नातेवाइकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजित कुऱ्हे या घटनेचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बाल न्याय अधिनियमानुसार आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसणाऱ्या आणि अनाथ मुलांच्या नावे लोकांकडून पैसे उकळणाऱ्या अवैध आश्रमाचा ‘मटा’ने भंडाफोड केला. यानंतर गुन्हे दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून १६ मुलांपैकी इतर मुले कुठे गेली, याचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणी आणखी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील.

प्रवीण लोणकर

लेखकाबद्दलप्रवीण लोणकरप्रवीण लोणकर हे महाराष्ट्र टाइम्समध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट, टेलिव्हिजन माध्यमातील १८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे ३ उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सामाजिक, शहर विकास आणि प्रशासकीय विषयांवर वेळोवेळी लिखाण करतात. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांना वाचा फोडली आहे.आणखी वाचा