Headlines

महाराष्ट्रातील एजंटामार्फत बँकॉकच्या ‎नोकरीसाठी झाली होती अनेकांची निवड‎:नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाण्याचे तरुणही माफियांच्या जाळ्यात‎




नोकरीच्या निमित्ताने बँकॉकला नेऊन ‎‎तिथून तरुणांना म्यानमार सीमेवर ‎‎ओलीस ठेवले जात असल्याचा ‎प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर ‎‎आला आहे. त्यांच्याकडून सायबर ‎‎गुन्हेगारी करून घेतली जात ‎‎असल्याचेही समोर आले आहे. ‎‎दरम्यान, महाराष्ट्रातील एजंटांमार्फत ‎‎बीडसह नाशिक, धाराशिव, ‎‎चाळीसगाव, ठाणे येथील तरुणांची ‎‎नोकरीसाठी निवड झाली होती. नंतर‎ या तरुणांना म्यानमार सीमेवर नेऊन ‎डांबण्यात आले आहे. इतर‎ जिल्ह्यांतील तरुणांचीही काही नावे‎ आता समोर आली आहेत. दरम्यान,‎बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत ‎काँवत यांनी तरुणाच्या सुटकेसाठी ‎परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आहे.‎ बँकॉक येथे ७० हजार रुपये महिना ‎पगाराच्या नोकरीची सोशल‎ मीडियातील जाहिरात पाहून केज‎ तालुक्यातील एका तरुणाने अर्ज‎ केला होता. त्या तरुणाने यापूर्वी‎ लाओसमध्ये नोकरी केल्याने त्याला‎ परदेशातील नोकरीचा अनुभव होता.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎त्याची नोकरीसाठी निवड होऊन ४‎ जून रोजी तो बँकॉकला गेला होता.‎ त्याच्यासह महाराष्ट्रातील नाशिक,‎धाराशिव, चाळीसगाव, ठाणे येथील‎ आणखी काही तरुणही होते. एका ‎एजंटाच्या माध्यमातून या तरुणांची ‎नोकरीसाठी निवड झाली होती. हे ‎सर्व म्यानमार सीमेवर अडकले.‎ मंत्रालयाला पत्रव्यवहार या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा नोंद‎ आहे. तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती देऊन‎ पत्रव्यवहार केला आहे. – नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड‎ केंद्राच्या हालचाली सुरू‎ या तरुणांना म्यानमार सरकारच्या ‎मदतीने सोडवून पुन्हा भारतात‎ आणण्यासाठी केंद्र शासनाकडून ‎हालचाली सुरू करण्यात आल्याची‎ माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत ‎सरकार याबाबतची सर्व माहिती‎ म्यानमार सरकारला देत आहे.‎ जंगलात आयटी पार्क‎ या तरुणांना जिथे जंगलात ठेवले ‎आहे तिथे गोदामासारखे मोठे‎ ऑफिस आहे. त्याला आयटी पार्क‎ म्हटले जाते. इथेच या तरुणांकडून‎ १६ ते १८ तास काम करून घेतले ‎जात आहे. नकार दिल्यानंतर ‎मारहाण केली जात आहे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत