Sneha Wagh : मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघचे दोन घटस्फोट झाले आहेत. वैयक्तिक आयुष्यात त्रास सहन केल्यावर अभिनेत्री आता अध्यात्माकडे वळली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘नीरजा एक नई पहचान’, ‘ज्योती’ आणि ‘वीरा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री स्नेहा वाघ आता भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झाली असून तिनं अध्यात्माचा स्वीकार केला आहे. वैयक्तिक आयुष्यात, स्नेहानं खूप त्रास सहन केला आहे. अभिनेत्रीचं दोनदा लग्न झालं, पण तिची दोन्ही लग्न मोडली. स्नेहा अभिनयात सक्रिय असली तरी, आता ती मुंबईऐवजी आपला बहुतेक वेळ मथुरेतील छटीकारा आणि वृंदावन येथे घालवते. स्नेहा वाघ सध्या ‘महादेव अँड सन्स’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे.
अध्यात्माबद्दल काय म्हणाली स्नेहा वाघ?
नुकत्याच एका मुलाखतीत स्नेहा वाघनं तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्ह्णाली की, ‘एक काळ असा होता जेव्हा माझा कोणावरही विश्वास नव्हता. मला वाटायचं की प्रत्येकजण स्वार्थी असतो. तेव्हाच मी अध्यात्म स्वीकारलं आणि माझं देवासोबत एक अनोखं नातं निर्माण झालं.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
स्नेहानं पुढे सांगितलं की, एका मंदिरातून आमंत्रण मिळाल्यावर तिनं पहिल्यांदा वृंदावनला भेट दिली. सुरुवातीला तिला वाटलं की, ही एक फसवणूक असू शकते, पण या प्रवासानं तिचा दृष्टिकोन बदलला. स्नेहा म्हणाली, ‘माझं आयुष्य अवघ्या तीन दिवसांत पूर्णपणे बदललं. तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला वाटलं की, मी मुंबईत राहण्याच्या योग्यतेची नाही. तिथे राहून आणि भगवान कृष्णाशी एकरूप झाल्यानं माझ्या मनाला शांतता मिळाली. भगवान कृष्णाचं ते निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम मला तिथे सापडलं. मी इतके दिवस त्या प्रेमाच्या शोधात होते.”मला आता कोणत्याही मानवी नात्याची गरज नाही, कारण भगवान कृष्णानं माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. मी सध्या इतकी समाधानी आहे की, मला ही परिस्थिती सोडून जायचं नाही. मी खूप समाधानी आणि चांगल्या मनःस्थितीत आहे.’ असंही स्नेहानं पुढे सांगितलं. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री बोलत होती.
स्नेहा वाघनं वयाच्या १९ व्या वर्षी अभिनेता आविष्कार दरवेकरशी पहिलं लग्न केलं, पण घरगुती हिंसाचारामुळे त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, स्नेहानं २०१५ मध्ये इंटिरियर डिझायनर अनुराग सोलंकीशी लग्न केलं, पण त्यांचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर स्नेहानं तिच्या दुसऱ्या पतीवर मानसिक छळ आणि अत्याचाराचा आरोप केला.
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं चाहत्यांना खास सरप्राइज, नव्या लूकसह शेअर केली आनंदाची बातमी दरम्यान, स्नेहाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘अधूरी एक कहानी’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री ‘एक वीर की अरदास वीरा’, ‘ज्योती’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘मेरे साई – श्रद्धा और सबुरी’, ‘ना उम्र की सीमा हो’ आणि ‘नीरजा – एक नई पहचान’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा