Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वातंत्र्य दिनानिमित्त संन्यास भाव आपल्या मनात रुजवा




आपण राष्ट्राचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. त्यावेळी राष्ट्रवासीयांचा स्वातंत्र्यभाव कसा असावा, याचाही विचार करूया. आपण देशवासीय या देशाचे निष्ठावान पायदळ आहोत. आपल्या भारतवासीयांसाठी एक शब्द आणि एक रूप आहे – संन्यास. संन्यासी असण्याचा अर्थ असा आहे की, परम स्वतंत्र जीवन, पण शिस्तीने बांधलेले. संन्यासी घोषणा करतो की आता तुझ्या भरवशाचे जीवन सुरू झाले आहे. म्हणजे जे काही आहे, ते ईश्वराच्या भरवशावर आहे. तरीही संन्यासी सर्वात स्वतंत्र असतो. स्वातंत्र्यदिनी आपण संन्यास-भाव आपल्या अंतरात उतरवूया. संन्यासी एकांतात ईश-रसाचे पान करतो. जेव्हा तो एकटा असतो, तेव्हा तो देवाबरोबर असतो. संन्यासी पूर्ण शिस्तीने तीन मार्ग अवलंबतो – ज्ञान, कर्म आणि उपासना. ज्ञान तबला आणि हार्मोनियमसारखे आहे, भक्तीचा मार्ग बासरीसारखा आहे आणि कर्म एक पूर्ण ऑर्केस्ट्रा आहे. आपणही स्वतःला असे स्वतंत्र करूया की, शिस्तबद्ध असावे, नियमाने काम करावे, पण गुलामगिरीची भावना निघून जावी.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत