कुणबी नोंदी रद्द झाल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. महायुती सरकारविरोधात जरांगेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळेंनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.