Headlines

Heavy Rain in Nashik Creates Flood Situation 19 Thousand Cusecs Water Discharged From Gangapur Dam


नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण भरलं आहे. यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Nashik Rain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, उद्भवलेली पूरस्थिती, बचाव कार्य, झालेले नुकसान या संदर्भात आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, मनपा वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुदैवाने नाशिक जिल्ह्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. दरम्यान, उद्यापासून जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, धोका अजून पूर्णपणे टाळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. याचबरोबर पाणी उकळून प्यावे. तसेच डेंग्यू, मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घ्यावी. याचबरोबर सध्या गंगापूर धरणातून 19000 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीमध्ये कायम असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नदी किनारी जाणे टाळावे तसेच व्यावसायिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

12 टीएमसी पाणी विसर्जित

सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणात सध्या 96 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसात 119 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 85 टक्के येईपर्यंत पाणी विसर्ग सुरू राहणार आहे. तर आतापर्यंत नाशिक विभागातून एकूण 12 टीएमसी पाणी हे विसर्जित करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

जायकवाडीला पाणी सोडण्यावरून आमदार फरांदे आक्रमक

दुसरीकडे जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आहे. तर तो मग एकतर्फी का? असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. नाहीतर आम्ही याच्याकडे लक्ष देऊ, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

जायकवाडी धरणाचा मृत 24 टक्के साठा हा वापरला जातोय आणि पुन्हा तो भरून देण्यासाठी नाशिकमधून पाणी सोडलं जातं. तो साठा पुन्हा भरून द्यावा लागतो. त्यामुळे नाशिककरांवर अन्याय होत असल्याचं देवयानी फरांदे यांनी यावेळी म्हटलं.

देवयांनी फरांदे यांचा इशारा

जायकवाडीमधील मृत साठा हा किती वापरला जातो याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हे लक्षात आणून द्यायचे काम अधिकाऱ्यांचे आहे. तर अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये, असे देखील त्यांनी यावेळी खडसावले. तर या गोष्टीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. अन्यथा आम्ही याकडे लक्ष देऊ, असा इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आमदार फरांदे यांनी दिला.

राहुल ढिकले यांच्या प्रशासनाला सूचना

रामकुंड परिसरात पडलेल्या खड्यांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला काम वेळीच पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राहुल ढिकले यांनी दिल्या आहे. मुंबई सारख्या घटना घडू नयेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रामकुंड परिसरात पडलेल्या खड्ड्याकडे लक्ष द्यावे आणि ती कामे पूर्ण करावी, अशा सूचना आमदार राहूल ढिकले यांनी दिल्या.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा