शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते असलेल्या सोनम वांगचुक यांनी सोडलेल्या उपोषणानंतर काही प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा २२ तारखेला जेव्हा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची रुग्णालयात जात भेट घेतली होती तेव्हाच ही शंका निर्माण झाली होती. उपोषण सोडत असताना प्रधान यांच्या राजीनाम्यावर मवाळ भूमिका घेतली. थोडक्यात काहीतरी काळेबेरं आहे किंवा राजीनाम्यावरून साटंलोट झालं असेच प्रश्न आता लोक सोशल मीडियावरून व्यक्त करताय. एकूणच काय २६ व्या दिवशी उपोषण सोडताना वांगचुक यांना सरकारनं काय आश्वासन दिलं, लेखी पत्रात कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीट पेपरफुटीवरून धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विषय आपल्याला महत्त्वाचा वाटला नाही. यावरून सोनम वांगचुक यांनी कोणती दुसरी बाजू मांडली आहे आणि त्यासाठीचा लढा कसा उभारता येईल यावर काय भाष्य केलंय… हेच आपण या व्हिडीओच्या माध्यामातून पाहणार आहोत.Educationist and environmental activist Sonam Wangchuk recently ended his hunger strike, triggering several questions and suspicions.Doubts surfaced especially after Union Ministers JP Nadda and Jitendra Singh met him in the hospital on the 22nd. While withdrawing the fast on the 26th, Wangchuk adopted a mild stand on Union Education Minister Dharmendra Pradhan’s resignation over the NEET paper leak scandal.