Headlines

‘डोपिंग’ची डोकेदुखी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वीच भारतीय खेळाडू संघाबाहेर, पाहा कोण?


Two Indian Athletes Out of the Squad due to Doping : ‘डोपिंग’ची डोकेदुखी पुन्हा! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. स्पर्धेआधी झालेल्या उत्तेजक चाचणीत एक ज्युदो पटू दोषी आढळल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले आहे.

Commonwealth Games 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रीडापटू महत्त्वाच्या स्पर्धेच्या सुमारास उत्तेजक चाचणीत दोषी आढळण्याची कूट मालिका या वेळीही कायम राहिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सामने सुरू होण्यापूर्वीच झालेल्या चाचणीत ज्यूदोपटू अरुणकुमार दोषी आढळला. त्याच वेळी भारताचे वेटलिफ्टर सातत्याने उत्तेजक चाचणीत दोषी ठरत असल्याचे सांगून भारतीय वेटलिफ्टरचा कोटा १६ वरून ११ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ पदक जिंकण्याची संधी असलेल्या स्पर्धकांनाच स्पर्धेस पाठवण्याचा निर्णय झाल्यामुळे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने १६ कोटा मिळूनही १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. आता तोही एकने कमी करण्याची वेळ आली आहे. ‘भारतीय वेटलिफ्टरचा कोटा एकने कमी केल्याचे कळण्यात आले. दिलबागसिंग हा काही दिवसांपासून पाठदुखीने बेजार होता. त्याने बर्मिंगहॅम येथील सरावात प्रामुख्याने विश्रांतीच घेतली होती. त्यामुळे त्याची प्रवेशिका माघारी घेण्याचे ठरले,’ असे सूत्रांनी सांगितले.
Maharashtra TimesWorld Test Championship : विराट-रोहित नाही, 9 जूनपासून द ओव्हलवर WTCची फायनल; पाचव्या स्थानावरील भारताला अंतिम फेरी गाठता येणार?
स्पर्धापूर्व चाचणीत दोषी ठरलेल्या ज्यूदोका अरुणकुमार दासला माघार घेण्यास भाग पडले आहे. तो गेल्या महिन्यात क्विंगदाओ ग्रां. प्रि. स्पर्धेत ७३ किलोपेक्षा कमी गटाच्या स्पर्धेत खेळला होता. त्याच्या नमुन्यात अॅनाबॉलिक स्टेरक़ईड आढळल्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ज्यूदो संघ २७ जुलैला रवाना होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडामधील ज्यूदो स्पर्धा ३१ जुलैपासून आहे. भारताने या स्पर्धेसाठी १४ ज्यूदोकांची निवड केली होती. अरुणने गतवर्षी आशियाई ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे त्याच्याकडून पदकाची आशा होती. गत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय ज्यूदोकांनी तीन पदके जिंकली होती.

Maharashtra TimesSachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर
राष्ट्रकुल क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेचा पात्रता कालावधी सुरू झाल्यापासून एन. अजित (७१ किलो), साईराज परदेशी (८८ किलो), हरचरणसिंग (११० किलो) यांच्यावर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे बंदी आली. त्याचबरोबर वंशिका वर्माच्याविरुद्धही (८६ किलो) कारवाई झाली होती.

तेजस नंदकुमारला वगळले

पॅरा जलतरणपटू तेजस नंदकुमार हा ५० मीटर फ्री स्टाइलमधील ‘एस-७’मधील निकष पूर्ण करीत नसल्याचे सांगत त्याला वगळण्यात आले. जागतिक पॅरा संघटनेने अपंगत्वाचे निकष बदलल्यामुळे तेजस अपात्र ठरल्याचे कळवण्यात आले आहे. हात आणि कमरेवरील भागाचा उपयोग करू शकणारे; पण पायात व्यंग असणारे स्पर्धक या ‘एस-७’ गटात असतात. नव्या निकषानुसार तेजस पॅरा जलतरणपटूमधील ‘एस-७’चे निकष पूर्ण करत नसल्याचे कळवण्यात आले आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM 1st T20 : मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण?

भारताची पदकनिश्चिती

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होण्यापूर्वीच भारताचे पदक निश्चित झाले आहे. बॉक्सर लवलिना बोरगोहाईनला महिलांच्या ७५ किलो गटाच्या स्पर्धेत थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. बॉक्सिंगमध्ये ब्राँझपदकाची लढत नसते. त्यात उपांत्य फेरीतील प्रवेश पदक निश्चित करीत असते. राष्ट्रकुल क्रीडा बॉक्सिंगमधील लवलिनाच्या गटात पाचच बॉक्सरचा सहभाग आहे. त्यामुळे या गटात एकच उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. लवलिनाची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी टी. के. बी. पी. ताकाफी हीला थेट अखेरच्या चार बॉक्सरमध्ये स्थान देण्यात आले आहे. ही लढत ३१ जुलैला होणार आहे. भारताने यंदाच्या स्पर्धेत ३० पदकांचे लक्ष्य बाळगले आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM 1st T20 : वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वे 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?
चार वर्षांपूर्वीच्या बर्मिंगहॅम स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. मात्र, त्या स्पर्धेतील अनेक खेळांच्या स्पर्धा या वेळी होणार नाहीत. या वेळी केवळ दहा खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. गतस्पर्धेतील कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट या खेळांचा यंदा समावेश नाही. अर्थात, राष्ट्रकुल स्पर्धेनंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. त्याच्या तयारीसाठी राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाची आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा